…अखेर आसोली गावातील बीएसएनएल रेंजचा प्रश्न सुटला…

2

उपसरपंच विकी केरकर यांच्यासह ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश…

वेंगुर्ला ता.१०: उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या दणक्या नंतर असोली गावातील बीएसएनएल रेंजचा प्रश्न मार्गी लागला आहे.यासंदर्भात येथील उपसरपंच विकी केरकर यांनी बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता पी.बी.कुंभार यांना टॉवर तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.दरम्यान याची दखल घेऊन श्री.कुंभार यांनी बीएसएनएलची सुविधा सुरळीत करून दिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.यावेळी नारायण घाडी,मंदार धुरी,संतोष चव्हाण,भूषण धुरी,मयुर नाईक,तुषार परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
आसोली गावात सुरवाती पासूनच गेली अनेक वर्षें बीएसएनएलचा खेळखंडोबा सुरू आहे.तर हल्लीच्या काळात गेले चार-पाच महिने ही समस्या अधिकच वाढली होती.येथील भागात बीएसएनएल शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे येथील मोबाईल धारकांवर आपले मोबाईल बंद करून ठेवण्याची वेळ आली होती.या समस्येमुळे येथील नागरिकांची संबंधित प्रशासनाबाबत तीव्र नाराजी होती.मात्र आता हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय थांबणार आहे.

15

4