आमदार वैभव नाईक यांनी घातले सागरास साकडे…
मालवण, ता. १४ : यंदाच्या मासेमारी हंगामात भरभराट होऊदे असे साकडे घालत आमदार वैभव नाईक यांनी आज सायंकाळी येथील सागरास श्रीफळ अर्पण केले.
शिवकालीन परंपरा लाभलेल्या नारळी पोर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी आज सायंकाळी येथील उत्सवास उपस्थिती दर्शविली. मच्छीमारांचा हंगाम बहरण्याबरोबरच त्यांची भरभराट होऊदे असे साकडे घालत सागरास श्रीफळ अर्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, अमित भोगले, नगरसेविका सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, दीपा शिंदे, विद्या फर्नांडिस, दत्तात्रय नेरकर, प्रवीण लुडबे, सन्मेश परब यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर बंदर जेटी येथे सुरू असलेल्या ज्येष्ठ कबड्डीपटूंच्या कबड्डी सामन्यास उपस्थिती दर्शवीत त्यांना शुभेच्छा दिल्या.