जिल्ह्यात १३ व २० फेब्रुवारीला जंतनाशक मोहीम राबवणार… 

92
2
Google search engine
Google search engine

सव्वा लाख मुलांना मिळणार फायदा; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती…

 

सिंधुदुर्गनगरी,ता.१२: जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १३ व २० फेब्रुवारीला जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ मुलांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली. जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ देणे आवश्यक आहे. यासाठी शासनही आवश्यक ते प्रयत्न करत आहे. शासनाकडून वर्षभरात दोन वेळा जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप केली जाणार असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. तर या दिवशी जी मुल गैरहजर राहणार त्यांना २० फेब्रुवारीला ही गोळी दिली जाणार असल्याची माहिती यावेळी डॉ.धुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेत पार पडली यावेळी डॉ रमेश कर्तस्कर उपस्थित होते . यावेळी डॉ. सई धुरी म्हणाले की, जंतामुळे मुलांमध्ये ॲनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार मळमळ, भूक मंदावणे, आतड्यावर सूज येणे आदी आजार डोके वर काढतात. यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील प्रत्येकाला वर्षातून दोनवेळा जंतनाशक गोळी देण्याची मोहीम शासनामार्फत दोनवेळा ही मोहीम राबविली जाते. यावर्षीची पहिल्या टप्प्यातील जंतनाशक गोळी वाटप मोहीम १३ फेब्रुवारीला राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत.

१ ते १९ वयोगटातील प्रत्येकाने वर्षातून दोनदा जंतनाशक गोळी घ्यायला हवी. जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ देणे आवश्यक आहे शासनमार्फत फेब्रुवारी आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यात या गोळ्या वाटप केल्या जातात. त्यानुसार या वर्षात जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी वाटप होणार असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९८ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. १ ते २ वयोगटातील मुलांना अर्धी गोळी पाण्यात विरगळुन, २ ते ३ वयोगटातील मुलांना १ गोळी पाण्यात विरघळुन तर ३ ते १९ वयोगटातील मुलांना पूर्ण गोळी चाउन खाण्यास दिली जाणार आहे. या जंतनाशक मोहिमेत एक ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालके, १ ते १२वी तील ६ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व शाळेत जाणारी मुले मुली, ६ ते १९ वयोगटातील शाळेत न जाणारी मुले मुली, यांचा समावेश असून या सर्व मुलांना शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी ,यांच्या माध्यमातून (एलबे डेझॉल) जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे .एकाच दिवशी १३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार असून या दिवशी गैरहजर असलेल्या मुलांना २० फेब्रुवारी रोजी गोळी दिली जाणार आहे. या मोहिमेत जंतनाशक गोळ्या शाळेमध्ये समक्ष खायला देण्यात येणार असून पालकांच्या हाती गोळ्या देणार नाही या मोहिमेची अंमलबजावणी सार्वजनिक आरोग्य विभाग महिला व बाल विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली तर १३ फेब्रुवारीला दिल्या जाणाऱ्या जंतनाशक गोळ्यांपासून आपली मुले वंचित राहू नयेत यासाठी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत हजर ठेवावे. असे आवाहन यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी केले आहे.