वेंगुर्ले,ता.२८: काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप भारतीयांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोडा येथे संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळत पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी रेडी जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अभिजीत राणे, काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, शिरोडा काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, निलेश मयेकर, कौशिक पांडुरंग परब, बाळा जाधव, पंकज मसूरकर, राम परब, ओम परब, श्रवण गावडे, विकास कावळे, शिवसेना शाखा प्रमुख राकेश परब, वेंगुर्ला युवासेना उपतालुका प्रमुख रोहित पडवळ, शेखर झाटिये, विराज राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी इर्शाद शेख म्हणाले, दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांचा बळी घेऊन त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.