कणकवली,ता.२८: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी जल्लोषी स्वागत केले. या रथयात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालयात झाला. त्यानंतर प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही रथयात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगमांवरील पाणी व माती मंगल कलशातून या रथयात्रेतून मुंबईला नेण्यात येणार आहे. १ मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त या मंगल कलशातील पाणी व मातीचा उपयोग करून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात आगमन झाल्यावर मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. किल्ल्यावर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर किल्ल्यावरील पवित्र माती आणि विहिरीतील पवित्र पाणी एकत्र करून त्याची पूजा-अर्चना करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात हा सोहळा अत्यंत आकर्षक आणि उत्साही वातावरणात पार पडला. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आणि उत्कृष्ट नियोजन पाहून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांनी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रगीत आणि राष्ट्रगीताने झाली. यावेळी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस एम.के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई परब, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, संदीप राणे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष गणेश चौगुले, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, सचिन अडुळकर, केदार खोत, सुनील उर्फ बाळू मेस्त्री, राष्ट्रवादी मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालवणकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे, देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावास्कर, तालुका उपाध्यक्ष विराज भालेकर, बंटी परब, कणकवली महिला तालुका अध्यक्षा स्नेहल पाताडे, जिल्हा सचिव सतीश पाताडे, वैभववाडी महिला तालुका अध्यक्ष श्रेया मुद्रस, रमेश मोपेलकर, शशी मुद्रस, मोहन लसने, साईद काझी, मुश्ताक काझी, हनिफ काझी, नजीर शेख, जिल्हा सचिव सुशील चमनकर, महिला तालुकाध्यक्षा वेंगुर्ला ऋतुजा शेटकर, शहर अध्यक्ष सूरज परब, वर्धा परब, वेंगुर्ला तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर, वेंगुर्ला उपाध्यक्ष सचिन पेडणेकर, संतोष राऊळ, दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष मेगेंद्र देसाई, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.