वेंगुर्ले,ता.३०: तालुक्यातील ग्रामपंचायत आसोलीचे ग्रामअधिकारी दत्तात्रय विष्णू पोवार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावर्षीचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ओरोस येथे त्याचे वितरण होणार आहे.
ग्रामअधिकारी दत्तात्रय पोवार यांनी गेली २५ वर्ष सेवा बजावली आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी चांगले काम केले आहे. सध्या ते आसोली येथील ग्रामपंचायत मध्ये सेवा देत आहेत. गावात घरपट्टी वसुली ८०.२५% पुर्ण केली, १५% मामास वर्गीय निधी ५% दिव्यांग निधी १००% खर्च केलेला आहे. तसेच १५ वा वित्त आयोगा मधून ६०% च्या वर निधी अनुदान स्वर्च केलेला आहे. त्याच बरोबर घरोघरी स्वच्छता अभियान, प्रधान मंत्री आवास घरकूल योजना यासारख्या योजनाही ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे राबविले आहेत. तसेच ग्रामपंचायत आसोली साठी नविन ग्रामसचिवालय इमारत बांधकाम पुर्ण करणेत आले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तीक लाभार्थीना फळबाग लागवड, शोषखडे इत्यादी योजनांचा लाभ देणेत आलेला आहे. तसेच ग्रामपंचायत आसोली कार्यक्षेत्रात विविध विकास कामे व शेती बंधारे बांधणेत आलेले आहेत. त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.