कणकवली, ता.१० : भारत देश आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ येत्या १२ मे ला कणकवली शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे करणार आहेत.
सकाळी ८.०० वाजता पटकी देवी मार्गे सुरू होणारी ही यात्रा तहसीलदार कार्यालयापर्यंत रवाना होईल. या यात्रेत शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक, रोटरी सदस्य, डॉक्टर्स, वकील आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारताच्या एकतेसाठी आणि सैनिकांच्या बलिदानाला सलाम करण्यासाठी आयोजित या तिरंगा यात्रेत सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.