Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
शेतकऱ्यांना घातला होता कोट्यावधींचा गंडा; मुंबईतून घेतले ताब्यात…
वेंगुर्ले : ता.२१
सुरंगी कळ्यांचा व्यापार करताना शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालून फरार असलेला वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील व्यापारी विजय अनंत गोडकर याला सव्वा वर्षानंतर शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे मुंबई कळवा पोलिसांनी अखेर अटक केली. त्याला आज वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गोडकर याला २ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील असोली, सोनसुरे, आरवली, टाक, जोसोली, आदी भागात मोठ्या प्रमाणात सुरंगी कळ्यांचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादित करत असलेले हे सुरंगीचे कळे विजय गोडकर ठरलेल्या दराप्रमाणे विकत घेऊन अत्तर बनवणाऱ्या कंपन्यांना पाठवीत असे. हा व्यवसाय करताना त्याने अनेक शेतकऱ्यांचे सुरंगीचे कळे घेऊन त्यांचे पूर्ण पैसे त्यांना दिले नाहीत. कालांतराने त्याने शेतकऱ्यांना दिलेले बँकेचे चेकही बाउन्स झाले. याबाबत शेतकऱ्यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी करू लागताच सन २०१८ मध्ये त्याने सर्व शेतकरी यांना सुमारे आठ ते दहा कोटी रुपयांना गंडा घालून शिरोडा गावातून पत्नी व दोन मुलग्यांना बरोबर घेऊन गावातून पळ काढला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात व वेंगुर्ले न्यायालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. वेंगुर्ले न्यायालयाने त्याच्या अटकेचा वॉरंट बजावला होता.
दरम्यान गेले वर्षभर पोलीस व शेतकरी त्याचा शोध घेत होते मात्र विजय कुटुंबासमवेत आपली राहण्याची ठिकाणे बदलत होता. अखेर शेतकऱ्यांना तो मुंबईत राहत असल्याचे समजताच विश्वनाथ धुरी यांच्यासह शेतकऱ्यांनी वेंगुर्ले न्यायालयाच्या वॉरंट नुसार कळवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन येथील पोलिसांच्या मदतीने विजय ज्या कांदिवली येथील एका चाळीमध्ये राहत होता तेथे सापळा रचून त्याला मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. तेथे तो पत्नी व मुलांसमवेत राहत होता. आज त्याला कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस व्ही एस कदम व व्ही एस पवार यांनी वेंगुर्ले न्यायालयात संध्याकाळी हजर केले असता न्यायालयाने विजयाला दोन डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.