बाबू सावंत; सावंतवाडी पंचायत समिती बैठकीत अधिकारी “टार्गेट”…
सावंतवाडी ता.०५:
अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेचं माजगाव-चिपटेवाडी या मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप,पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी आज येथे केला.दरम्यान ग्रामस्थांचा विचार करता लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तात्काळ वनविभागाला परिपुर्ण प्रस्ताव द्या,अशी सुचनाही श्री.सावंत यांनी संबधित अधिकाऱ्यांना केली.
येथील पंचायत समितीची मासिक बैठक आज सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी व्यासपीठावर उपसभापती शितल राऊळ,गटविकास अधिकारी गजानन भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी शासनाच्या कामाचा विविध विभागवार आढावा घेण्यात आला.यामध्ये झालेल्या चर्चेत, सुरवातीलाच पाणी पुरवठा योजनेची कामे सुचवितांना परस्पर गांवाची नावे घेण्यावरून सदस्य संदिप गावडे यांनी प्रश्न उपस्थित केला,खनिकर्म निधीतून होणार्या या कामाबाबत निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार हा पालमंत्र्याना असतो त्यामुळे त्याबद्दल आमचा विरोध नाही मात्र लोकप्रतीनीधी म्हणुन याबाबत कल्पना देणे गरजेचे होते,असे सांगितले.मात्र अधिकारी सुदेश राणे यांनी वेळोवेळी याबाबत आपण ग्रामपंचायतीना कल्पना दिली असल्याचे स्पष्ठ केले.
दुसरीकडे सार्वजनिक बांधकामचे बरसेचे रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाकडे गेले आहेत.मात्र असलेल्या रस्तावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयाचा विचार करता हे खड्डे तात्काळ बुजविण्याबाबत,हालचाली व्हाव्यात अशी मागणी सदस्य रविद्र मडगावकर यांनी केली.माजगाव ते चिपटेवाडी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर रस्त्याचे काम अधिकार्याच्या गलगर्जीपणामुळे रेंगाळले आहे,असा आरोप श्री.सावंत यांनी करत अधिकारी आर ए धरणे यांना धारेवर धरले.वनविभाग काम करण्यात आडकाठी आणत असल्याने हे काम होत नाही,अशी स्पष्ठोती श्री.धरणे यांनी दिली.मात्र वनविभागाला २०१२ चा शासन निर्णय जोडून जिल्हा परिषद अध्यक्षाच्या पत्राने लक्ष वेधले असतांनाही केवळ तुमच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता झालेला नाही,नेहमी मासिक बैठकिला गैरहजर राहता मग आम्हाला याबाबत नेमके काय झाले हे कळणार कसे, सभागृहाला थातुर मातुर उत्तरे देऊन दिशाभुल करू नका,रखडलेला बाराशे मिटरचा रस्ता झाला असता तर पाच किमी मध्ये तेथील ग्रामस्थ सावंतवाडीत पोहचले असते,असे सावंत यांनी सुनविले,आता याबाबात जातीनिशी लक्ष घालुन रितसर वनविभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करा,अशी सुचना केली.
तर ऑक्टोबर नोव्हेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकर्याच्या भातशेतीच्या नुकसानीचे पैसे तहसिल कार्यालयाकडे जमा आहेत.मात्र प्राप्त निधीपैकी सत्तर टक्केच निधी वाटप झाला याबाबत कृषी अधिकारी यांना रविंद्र मडगावकर यांनी जाब विचारला असता हमीपत्राअभावी पैसे शेतकर्याच्या खात्यावर टाकण्यात अडचण निर्माण झाल्याचे उत्तर दिले.पंरतू हमीपत्र देऊनही पैसे का जमा होत नाही?,असा संतप्त सवाल मडगावकर यांनी केला असता ते निवृत्तर झाले,चांदा ते बांदा प्रमाणे पैसे पुन्हा शासनाकडे जमा होऊ नये,यासाठी तात्काळ याबाबत निर्णय घ्या तहसिलदारांनी याबाबत लक्ष घालावा,अशी मागणी श्री.मडगावकर यांनी केली.
यावेळी विविध शासनाच्या सुरू असलेल्या कामाबाबत चर्चा करतांना संबधित अधिकार्यांना योग्य सुचना देण्यात आल्या.