Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआरोग्यासारख्या प्रश्नावर मनसेने राजकारण करणे योग्य नाही...

आरोग्यासारख्या प्रश्नावर मनसेने राजकारण करणे योग्य नाही…

रेवती राणे; सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांना सल्ला…

कुडाळ ता.०७: सावंतवाडी शहरातील व परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे यांनी रुग्णालयाची पाहणी केली.ज्या समस्या आहेत त्या समस्यांबाबत त्या आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत त्यामुळे यात गैर ते काय?,असा प्रश्न करून अशा संवेदनशील विषयाचे मनसेने राजकारण करू नये,असा सल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रेवती राणे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी तळागाळात येऊन झटणारा पक्ष आहे.त्यामुळे पक्षाच्या निरीक्षक अर्चना घारे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला.याबाबतचा अहवाल त्यांनी आपण वरिष्ठांना तसेच आरोग्यअधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे त्यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले तर त्यात गैर काय?, महिलांचा प्रश्न महिला समजू शकतात त्यामुळे अशा संवेदनशील प्रश्नात कोण
राजकारण करत असेल तर ते चुकीचे आहे,असे त्यांनी म्हटले आहे.पक्षनिरीक्षक सौ. घारे यांनी येथील कुटीर रुग्णालयाची पाहणी केली होती.याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष सुभेदार यांनी त्यांच्यावर टीका केली होती.तुम्ही सत्तेतले घटक असताना अशा प्रकारचा दिखाऊपणा का केला जातो.आमच्या सारखे प्रत्यक्षात काम करा असे त्यांनी म्हटले होते.त्याला सौ.राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments