मौदे येथील घटना; ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना निवेदनाव्दारे इशारा
वैभववाडी ता.१३:मारहाणीत गंभीर जखमी होऊन मयत झालेल्या दत्ताराम परशुराम मोरे वय ३४ वर्षे रा. मौंदे याच्या मारेक-यांवर खूनाचा गुन्हा नोंद करुन तात्काळ अटक करावी.अशी मागणी मौंदे ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. अन्यथा १८ फेब्रुवारी पासून ग्रामस्थ गावातील शाळाही बंद ठेवून गावच्या ग्रामदैवत बावचादेवी मंदिरात आमरण उपोषणास बसतील. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे. या निवेदनावर १५० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौंदे येथील मयत दत्ताराम मोरे हा दिनांक २६ जानेवारी रोजी केस कापण्यासाठी हेत शेवरी फाटा येथे गेला होता.त्याला केव्हातरी दारु पिण्याची सवय असली तरी त्याचा गावात अथवा बाहेरच्या कोणाला ञास नव्हता.त्याच्या विषयी कोणाची तक्रार नव्हती.
केस कापण्यास गेलेल्या मयत मोरे याच्याकडे असलेल्या दोन दारुच्या बाटल्या पुरुषोत्तम पांचाळ व चिंतामणी सुतार यांनी काढून घेतल्या याच्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली.यातून या दोघांनी त्याला बेदम माराहाण केली.माराहाणीत तो बेशुध्द पडल्यामुळे त्याला चार चाकी गाडीत घालून उपळे खिंड येथे गटारात टाकून माराहाण करणारे पसार झाले.तो राञभर गंभीर जखमी अवस्थेत पडून होता.सकाळी शुध्दीवर आल्यावर तो चालत शेवरी फाटा येथे आला.तिथे खानविलकर यांच्या हाॕटेलमध्ये पाणी पिऊन तो हळूहळू चालत भोम येथील कृष्णा पाटेकर यांच्या घरापर्यंत गेला.तिथे त्याला गावातील चंद्रकांत मोरे यांनी पाहीले.त्यांनी त्याला गावात जाणाऱ्या मौंदे एस.टी.बसमध्ये घेतले.घरी गेल्यानंतर मयत मोरे यांनी घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.यादरम्यान डाॕ.जगन्नाथ शंकर जामदार हे मौंदे येथे आले त्यांनी इंजेक्शन दिले.माञ त्याची प्रकृती अधिक गंभीर बनली. याला हेतात काल मारल आहे.असे डाॕक्टरांनी उपस्थितांना सांगितलं.
मयत दत्ताराम मोरे याला अधिकच वेदना होऊ लागल्यामुळे वैभववाडी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. माञ त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे डाॕक्टरांनी त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर .रुग्णालयात दाखल करण्यात आले.याठिकाणी उपचारादरम्यान दि.२९ जानेवारी रोजी निधन झाले.माराहाणीची माहीती रुग्णालयात दिली तर उपचाराला विलंब होईल, वेदनेने विव्हळणा-या आपल्या मुलावर प्रथम उपचार व्हावे.यासाठी आईने याबाबत मौन पाळले होते.
मयत दत्ताराम मोरे याच्या मारेक-यावर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही.अशी भूमिका मयताचे कुटुंब व ग्रामस्थांनी घेतली होती.यावेळी वैभववाडी पो.निरीक्षक दत्ताञय बाकारे यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दोन दिवसात कारवाई करतो.असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.त्यांच्यावर विश्वास ठेवून मृतदेहावर दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशीरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेला आता १२ दिवस उलटून गेले तरी अदयाप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
मयत मोरेच्या मारेक-यांवर गुन्हा नोंद करुन तात्काळ अटक करावी अन्यथा येत्या १८ फेब्रुवारी रोजी मौंदे ग्रामस्थ शाळेतील मुलांसह बावचादेवी मंदिरात आमरण उपोषण करतील.यावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.