विनायक राऊत;पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न वर्षात मार्गी लावू
सावंतवाडी.ता,१४: मोपा विमानतळ झाले तरी,त्याचा चिपी विमानतळावर कोणताही परिणाम होऊ देणार नाही. तसा शब्द आम्हाला केंद्राने दिला आहे.दरम्यान “चांदा ते बांदा” योजना कदापिही बंद होऊ देणार नाही त्यातील जाहीर करण्यात आलेल्या योजना या पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी नक्कीच पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करेन येत्या वर्षभरात हा प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.