नितेश राणे : मिनी कॅबिनेट बैठक फक्त शोभेसाठी
कणकवली, ता.१६ : नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्प बाबत विकास आघाडी चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. तसेच आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गात होणारी कॅबिनेट बैठक फक्त शोभेसाठी आहे. त्यातून कोकणासाठी भरीव निधी मिळण्याची अपेक्षा नाही अशी टीका आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले.
येथील प्रहार भवन मध्ये श्री राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोकणसाठी पाच हजार कोटीचे पॅकेज आणले होते. आता मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येत आहेत, त्यावेळी सिंधुदुर्गचा विकास आराखडा ते 118 कोटी वरून 225 कोटी पर्यंत वाढविण्याचे हिम्मत दाखवणार का? तसेच मुख्यमंत्री ज्या काही घोषणा करतील, त्यांना अर्थमंत्री अजित पवार निधी देणार का याचाही खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा.
श्री राणे म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानतळाची पाहणी करणार आहेत. पण विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काय? वीज पुरवठा आणि पाण्याची सुविधा ही विमानतळापर्यंत पोहोचलेली नाही अशावेळी विमानतळाची पाहणी करून मुख्यमंत्री काय साध्य करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नानार येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा ही भाजप पक्षाची भूमिका आहे. आमची देखील तीच भूमिका आहे शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला. मात्र सामना वर्तमानपत्रात रिफायनरी ची जाहिरात आली आहे. दुसरीकडे खासदार विनायक राऊत हे नानार प्रकल्प होणार नसल्याचे अजूनही सांगत आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस भूमिका जाहीर करायला हवी.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरही श्री राणे यांनी टीका केली, गेली काही वर्षे कोकण किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाची स्थिती आहे तर पालकमंत्री पर्ससीन नेट धारकांच्या बाजूने भूमिका घेत आहेत. माझी पालक मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमाणेच त्यांनी बैठकांचा धडाका सुरू केला आहे परंतु या बैठकांमधून सिंधुदुर्गच्या विकासाचे काहीही निष्पन्न होणार नाही असेही श्री राणे म्हणाले.