उद्धव ठाकरे;पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून जिल्हावासियांना विश्वास
वेंगुर्ले.ता,१८: सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान ठरणाऱ्या चिपी विमानतळावरून मे महिन्याच्या १ तारखेला विमान उडेल.त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिला.दरम्यान उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या अधिकार्यांसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करावा अशाही सूचना श्री.ठाकरे यांनी दिल्या.उद्धव ठाकरे यांनी आज विमानतळाला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.प्रथम विमानतळ पाहणी करून नंतर त्यांनी अधिकार्यांधी चर्चा केली. यावेळी फक्त पदाधिकारी व अधिकारीच उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, वेंगुर्ल्याच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ,तालुकाध्यक्ष बाळू परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.