कणकवली
कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला ब्रिजवर आदळून कोल्हापूरातील पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे.यात एक जण जागीच ठार झाला.आशिष आरगे ( वय 30),असे त्याचे नाव आहे.तर वैभव कांबळे,गणेश पवार,अभिषेक आरसोले, सुहास चव्हाण (चालक) हे जखमी झाले आहेत.सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान जखमींना अधिक उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे सर्व पर्यटक गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते.दरम्यान ते नांदगाव नजीक आले असतात कार चालकाचा कारवरील ताबा सुटला व कार सरळ जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या ब्रिजवर धडकली.यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.