राजू मसुरकर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी
सावंतवाडी.ता,२४: दिल्ली राज्याप्रमाणे महाराष्ट्रात विजेचे दर आकारण्यात यावेत अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.सद्यस्थितीत वीज कंपनीकडून आकारण्यात आलेल्या दरामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका सहन करावा लागत आहे.ज्या ठिकाणी दिल्लीत चारशे युनीटचे अकराशे रुपये बील येते.त्याठिकाणी महाराष्ट्रात मात्र २९०० रुपये भरावे लागत आहेत.त्यामुळे याबाबत विचार व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन श्री मसुरकर यांनी श्री ठाकरे यांना पाठवले आहे.सर्वसामान्यांचे आधीच महागाईमुळे कंबरडे मोडले यामुळे आता वीज बिलाच्या माध्यमातून लोकांवर पडत असलेला बोजा कमी करण्यात यावा असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.