Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापाणी प्रश्नावरून विरोधकांचा गोंधळ म्हणजे निव्वळ "स्टंटबाजी"...

पाणी प्रश्नावरून विरोधकांचा गोंधळ म्हणजे निव्वळ “स्टंटबाजी”…

परीमल नाईक;दोन महिन्यात प्रश्न सुटायला आमच्याकडे जादुची कांडी नाही

सावंतवाडी.ता,२७: आजच्या पालिके सभेत विरोधी नगरसेवकांकडून घातलेला गोंधळ म्हणजे निव्वळ स्टंटबाजी होती. आम्हाला विकास नक्कीच करायचा आहे.पण दोन महिन्यात जादूची कांडी फिरवू शकत नाही असा टोला आज येथे आयोजित पत्रकार परिषद पालिकेच्या आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी केला .
दरम्यान गेली १५वर्ष यांच्याकडे सत्ता आहे.मात्र त्यांनी पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष का दिले ३०० कनेक्शन असलेली नळपाणी योजना आता साडेतीन हजार कनेक्शनची झाली आहे.त्यामुळे या नळपाणी योजनेची क्षमता वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.असे पाणी पुरवठा सभापती नासिर शेख यांनी सांगितले. पालिका सभेच्या गोंधळानंतर आज सत्ताधाऱ्यांनी आज याठिकाणी पत्रकार परिषद घेतली.यावेळी पाणीपुरवठा सभापती नासीर शेख उदय नाईक, सुधीर आडिवरेकर, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, राजू बेग आदी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी श्री नाईक म्हणाले गेल्या पंधरा वर्षात सत्ताधाऱ्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. पाण्यासारखा महत्त्वाच्या प्रश्नावर नेहमी दुर्लक्ष झाले.त्यामुळे शहरातील अनेक भागांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.हा सर्व प्रकार आम्ही सभागृहात मांडू या ठिकाणी आम्हाला जाब विचारण्यात आला. दोन महिन्यात आम्ही काय करू शकतो.याचे उत्तर त्यांनी जन्माला द्यावे आमच्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही त्यामुळे त्यांनी असे प्रश्न करणे चुकीचे आहे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments