काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा विश्वास; विकास सावंतांना वाऱ्यावर सोडणार नाही…
सावंतवाडी ता.२९: आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष होईल,त्या दृष्टीने आमची मोर्चेबांधणी सुरू आहे.दरम्यान माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांचे सुद्धा योगदान मोठे आहे.त्यामुळे त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही,तर त्यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात येईल,असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी व्यक्त केला.दरम्यान काँग्रेसला अर्धवट सोडून गेलेले नारायण राणे यांचा “फॅक्टर” संपल्यात जमा आहे.त्यांचा फायदा कोणाला झाला,की त्यांना झाला हेच नेमके कळु शकले नाही,असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.आज येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळा गावडे,माजी आमदार सुभाष चव्हाण,माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण,माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर,दादा परब,राजू मसुरकर, इर्शाद शेख,राघवेंद्र नार्वेकर,आशा कंठक ,कौस्तुभ गावडे,आदी उपस्थित होते.