राजू कासकर यांची भूमिका; तुमच्या इगो प्रॉब्लेमचा फटका ग्राहकांना नको…
सावंतवाडी,ता.०३: आठवडा बाजार वरून निर्माण झालेला वाद व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून प्रश्न सोडवणे गरजेचे होते,मात्र लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलेल्या नगराध्यक्षासह नगरसेवकांचा त्यांनी केलेला निषेध अत्यंत चुकीचा आहे.आम्ही त्याला विरोध करतो,अशी भूमिका मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर यांनी मांडली.दरम्यान आठवडा बाजाराच्या दिवशी “इगो प्रॉब्लेम” धरून अचानक बाजार बंद करून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी नेमके काय साधले ?, त्यांनी लोकांच्या व गृहिणींच्या मानसिकतेचा विचार करणे गरजेचे होते.असेही त्यांनी म्हटले आहे.
श्री.कासकर यांनी याबाबत प्रसिद्धी पत्र दिले आहे.यात त्यांनी असे म्हटले आहे की,नगराध्यक्षांनी बाजार अन्यत्र हलवण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याचा निर्णय ग्राहक घेतील.मात्र तडकाफडकी त्या निर्णयावरून नगराध्यक्षांचा व नगरसेवकांचा निषेध करणे चुकीचे आहे.याबाबत त्यांनी सर्व पालिका पदाधिकाऱ्यांशी बोलणे गरजेचे होते.त्यानंतरच पुढील भूमिका घेणे गरजेचे होते.मात्र केवळ आपला “इगो प्रॉब्लेम” करून त्यांनी अचानक बाजार बंद केला.परंतु त्यामुळे ग्राहकांना झालेला मनस्ताप आणि व्यापाऱ्यचे झालेली नुकसान याला जबाबदार कोण? तसेच सावंतवाडी बाजारपेठ आज मराठी उद्योजकांनी व व्यावसायिकांनी आपले बस्तान मोठ्याप्रमाणात मांडले आहे.त्याला विरोध करताना हे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी कधी दिसले नाही,असाही टोला कासकर यांनी या पत्रकात लगावला आहे.