माणगाव, ता. ४: माळवाडी येथील शेतकरी संजय वसंत गावडे (वय ४५)यांच्या घराच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठ्याला आज सायंकाळी सात सुमारास अचानाक भीषण आग लागली.आगीने रूद्र रूप धारण करून गोठा पुर्णपणे जळुन खाक झाला आहे.गोठ्यामध्ये चार जनावरे बांधलेली होती.चारही जनावर गंभीर जखमी झाली आहेत.पशुवैद्यकीय डॉक्टर श्री मेस्त्री व श्री देसाई यांनी गुरांवरती उपचार केले. मालक संजय गावडे ही किरकोळ जखमी झाले त्यांना खाजगी रूग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रुपेश नानचे,ग्रा पं सदस्य श्री दीपक नानचे,अक्षय पालकर, गणेश पालव,विनय आडेलकर,ज्ञानबा धुरी, अतुल सावंत, यांनी मदत केली.सर्वत्र माणगाव खोऱ्यात चर्चा सुरू होती.