Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोकण रेल्वेच्या विरोधात सावंतवाडीत १ मे रोजी "एल्गार आंदोलन"...

कोकण रेल्वेच्या विरोधात सावंतवाडीत १ मे रोजी “एल्गार आंदोलन”…

डी.के.सावंत यांचा इशारा; प्रवाशांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचा दुर्लक्ष झाल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.११: कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी १ मेला सावंतवाडीत “एल्गार आंदोलन” छेडण्यात येणार आहे.या आंदोलनाला सर्व कोकण रेल्वे प्रवासी आणि प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी.के.सावंत यांनी केले आहे.याबाबत श्री.सावंत यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
श्री.सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे,कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत.गेल्या १९ मे २०१९ रोजी सावंतवाडी येथे आयोजित उपोषण आंदोलन केले होते.त्यावेळी वा नंतर अनेक राजकीय नेत्यांनी रेल्वे मंत्री व मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांच्याशी संपर्क साधून कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र आजपर्यंत फक्त तुतारी एक्स्प्रेसला एक वातानुकूलित,२ स्लीपर व २ जनरल डबे जोडण्यात आले.१२०५१/५२ जनशताब्दी एक्स्प्रेसला सावंतवाडी येथे व १६३४५/४६ नेत्रावती एक्स्प्रेसला खेड येथे अंशकालीन थांबा देण्याची मोठी मेहरबानी केल्याचा निरर्थक आव आणला.असे म्हणण्याचे कारण दोनही ठिकाणी थांबा दिला पण आरक्षण नाही.कारण आरक्षण चार महिने आगाऊ होते आणि थांबा तीन महिन्यांसाठी.
कोकणातील १० लाखांहून अधिक कुटुंबे मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे भागात आपल्या उदरनिर्वाहासाठी स्थायीक असून सणावाराला, कौटुंबिक बऱ्यावाईट प्रसंगी, जत्रा – महोत्सव, धार्मिक विधी यासाठी आपल्या जन्म भूमीशी संपर्क असल्याने वारंवार फेऱ्या मारत असतात. हे विचारात न घेतल्यामुळे आज जनावरांप्रमाणे हालात प्रवास करत आहेत. कोकण रेल्वे प्रवाशांची इतकी क्रुर चेष्टा आजपर्यंत कोणीच केली नसेल.दक्षिण – उत्तर भारतात धावणाऱ्या गाड्यांना मात्र मुबलक गाड्या, गर्दी पाहून जादा डबे जोडण्यात येतात.
कोकण रेल्वे साठी कोकणी जनतेने आपल्या बहुमुल्य जमीनी दिल्या तरी प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न अर्धवट. इतके असुनही कोकण रेल्वे प्रवासी आता पर्यंत गेली तेवीस वर्षे सर्व सहन करत आहेत.आता कोंकण रेल्वे प्रशासनाला जोरदार धक्का देण्यासाठी १ मे २०२० रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या एल्गार आंदोलनाला आता पासूनच तयारी करण्यासाठी विभागवार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तरी सर्व कोकण रेल्वे मार्गावरील कोकणी प्रवाशांनी या आंदोलनात सहभागी होऊन विभागाच्या संघटनाना सहकार्य करावे व एल्गार आंदोलन करुन रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी सहकार्य करावे.
मागण्यांची निवेदने रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांना वारंवार दिलेली आहेत.
यातील प्रमुख मागण्या,
दादर- रत्नागिरी सकाळी सुटणारी पॅसेंजर, वसयी/ डहाणू- सावंतवाडी व कल्याण- सावंतवाडी गाड्या त्वरीत चालू करणे, मुंबई वरून सुटणाऱ्या व दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी तीन ठिकाणी व उत्तर- दक्षिण जाणाऱ्या गाड्या (पालघर जिल्ह्यात सुद्धा) प्रत्येकी दोन ठिकाणी थांबविण्यात याव्यात. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करुन मुख्यालय रोहा ते मडगाव दरम्यान हलवावे, १२२०१/०२ गरीब रथ गाडीची वेळ चार ते पाच तास आधी किंवा उशिरा करण्यात यावी. तुतारी एक्स्प्रेस व दिवा पॅसेंजर गाडी २२/२३ डब्यांची करण्यात यावी. पुणे एर्नाकुलम गाडी आठवड्यातून दोन दिवस धावते उरलेले पाच दिवस कल्याण मार्गे सावंतवाडी पर्यंत सोडावी, वांद्रे मंगलोर गाडी बारमाही सोडण्यात यावी, सुट्टी कालीन गाड्या सुर्यास्ता पूर्वी कोकणात पोहोचतील अशा बेताने सोडाव्यात, डहाणू पनवेल मेमु चिपळूण पर्यंत वाढविण्यात यावी.
वरील मागण्या रास्त असून त्या संबंधितांनी दखल घेऊन सोडविण्यासाठी सर्व पक्षांतील नेते कार्यकर्ते यांनी व लोकप्रतिनिधीनी सहकार्य करावे ही विनंती.
१ मे २०२० चलो सावंतवाडी.
डी के सावंत अध्यक्ष
सर्व पदाधिकारी आणि सभासद
कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
[3/11, 2:37 PM] Amol Da: दारू वाहतूक करणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला आहे ही घटना आज सकाळी माळ्याची वाडी परिसरात घडली दरम्यान कार्यालयाने गाडी तेथे टाकून पळ काढला अक्षय विलास राणे असे मृत झाल्याचे नावे हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको करत पोलिसांना धारेवर धरले मोठ्या प्रमाणात सुरू असलेली दारू वाहतुकीला पोलीस प्रशासन जबाबदार आहे असा आरोप केला तसेच संबंधित अपघाताला जबाबदार कोण याचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली त्यामुळे पोलिस निरुत्तर झाले उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता तो अपघात निवृत्ती पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीत की पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाला हे अद्याप पर्यंत एकमत होत नाही त्यामुळे अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आल्यात नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले या अपघातानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आता पुढे आले आहे याला कोणाचा आशीर्वाद आहे ह्याचा शोधणे गरजेचे आहे त्यामुळे सिन्नर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक कुमार गेडाम याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments