मुख्यमंत्र्यांचे आवाहन: उद्यापासून 25 टक्केच शासकीय कर्मचारी कामावर येणार…..
मुंबई ता.२०: कोरोनाच्या विरुद्धचे संकट जर जिंकायचं असेल तर माणुसकी सोडू नका,एकमेकांना सहकार्य करा,तसेच खाजगी कंपन्यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये,आवश्यक व जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकाने बंद राहतील,हे सर्व आपल्या फायद्यासाठी महत्त्वाचे आहे.त्यासाठी स्वतःला निर्बंध घालून घ्या,अशी भावनिक साद राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.दरम्यान हे संकट सर्व जग व्यापून टाकत आहे.त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.उद्यापासून फक्त २५ टक्के शासकीय कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत.मात्र लाईफ-लाईन समजली जाणारी मुंबईची रेल्वे व बस सेवा बंद करणे शक्य नाही,असेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली