तपासणीत उघड; जबाबदार असणार्यांवर कडक कारवाई करा,साईप्रसाद कल्याणकर…
सावंतवाडी,ता.२०:रेडी गावात आढळलेल्या सात विहीरीपैकी चार विहीरीतील पाण्याचे नमुने दुषित आढळून आल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकाराला जबाबदार ठरणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी ब्रेकींग मालवणीशी संपर्क साधून ही माहीती दिली.
ते म्हणाले, रेडी तालुका वेंगुर्ला येथील असलेल्या सार्वजनिक व खासगी विहिरींचे पाणी दूषित असल्याची तक्रार आपण जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. त्यानुसार त्यांनी कालच आपल्याला आवाज दिला आहे. या सातपैकी चार विहीरींचे पाणी दूषित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तसेच जे पाणी दूषित आहे, त्या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी. अशा सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान हा सर्व प्रकार चुकीचा आहे. लोकांच्या जीवाशी खेळणे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी संबंधित जबाबदार असलेल्या व दंडात्मक कारवाई करून कठोर पावले उचलण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.