सिंधुदुर्गनगरी ता.२२: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात १३० व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाविषयी कोणहीती लक्षणे नाहीत पण,खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.या सर्व व्यक्तींनी क्वारंटाईन विषयी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे,कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये,घरामध्येही कुटुंबियांपासून बाजूला रहावे, त्यांची सुश्रृषा करण्याचे काम घरातील एकाच व्यक्तीने करावे, थेट त्वचेस स्पर्श करू नये, मास्कचा वापर करावा, त्यांचे कपडे, पांघरून या गोष्टी रोजच्या रोज डिटर्जंटचा भरपूर वापर करून स्वच्छ धुवावीत. या सर्व गोष्टींविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सूचना देण्यात येत आहेत.त्यांचे पालन करावे. . एखादी व्यक्ती क्वारंटाईन केलेले असताना घराबाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमाक गेडाम यांनी दिल्या आहेत.
जिल्ह आरोग्य संस्थांमार्फत एकूण 739 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 250 परदशी प्रवाशआंचा समावेश आहे. या तपासणीमध्ये एकही रुग्ण कोरोना सदृष्य आढळलेला नाही. तसेच जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथील विलगीकरण कक्षामध्ये 6 व्यक्ती दाखल असून त्यांची प्रकृती चांगली आहे. सदर रुग्णांमध्ये कोरोनाची कोणहीती लक्षणे नसून किरकोळ खोकला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर व केंद्रावर 20 थर्मल स्कॅनर पुरविण्यात आले असून रुग्णांच्या शरिराचे तापमान याद्वारे तपासण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींना 14 दिवस अलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात येत आहे