आरोग्यमंत्र्यांची माहीती;राज्यात रूग्णाच्या संख्येत वाढ,तिस-या रूग्णाचा मृत्यू
मुंबई ता.२३: महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे.आज राज्यात तब्बल १५ रूग्ण नवे आढळून आले आहेत.त्यातील १४ जण मुंबईतील आहेत,अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.दरम्यान एकीकडे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, धोका बळावलेला असताना,मुंबईकर मात्र थांबण्यास तयार नाही.
लोकल व बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी गाड्या घेऊन प्रवास करताना मुंबईकर दिसत आहे.त्यामुळे गरज असल्यास बाहेर पडा अन्यथा कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही,असा इशारा टोपे यांनी दिला आहे.दरम्यान आज सकाळी कोरोना विषाणूमुळे राज्यात तिसरा बळी गेला आहे.संबंधित व्यक्ती ही मुंबईची आहे,त्यांचे वय ६८ इतके आहे.तो रुग्ण फिलिपिन्स मधून राज्यात आला होता.अशी माहिती मिळाली आहे.