पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा;देशातील प्रत्येकाला वाचविण्यासाठी कठोर निर्णय…
मुंबई ता.२४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून पूर्ण देशात लॉकडाऊन चे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जनतेला वाचविण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री.मोदी म्हणाले, देशावर आलेले हे महारोगाचे संकट आहे.ते एकत्र येऊन दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यामुळे आम्ही काही कठोर निर्णय घेत आहोत,या या पार्श्वभूमीवर आज रात्रीपासून २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे.या काळात कोणी घरातून बाहेर पडणार नाही,याची काळजी घ्यावी एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता पंधरा हजार कोटी रुपयांचे पॅकेज त्यासाठी जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे यावर आपण निश्चितच तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.परंतु दुसरीकडे चीन,अमेरिका, जर्मनी, फ्रान्स ,इटली ,इराण यासारखे बलाढ्य देश या महामारी पासून वाचू शकले नाहीत.त्यामुळे लोकांनी आपल्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे,आपला जीव वाचला तर आपण काहीही करू शकतो हे निश्चित आहे. त्यादृष्टीने देशातील लोकांनी प्रयत्न करावे “जान है तो पगडी पचास…” असे सांगून या संकट आणि संक्रमणाचा सामना करण्यासाठी आम्ही केंद्र सरकार म्हणून प्रयत्नशील आहोत मात्र हे सर्व करत असताना लोकांनी अफवा आणि अंधविश्वास आवर विश्वास ठेवू नये,डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा,काही झाले तरी अद्यापपर्यंत या आजाराला औषध मिळत नाही.त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठे फिरू नये, आणि हा दर संक्रमित असल्यामुळे एकापासून दुसर्याला धोका निर्माण होणार नाही,याची काळजी घ्यावी,असे मोदी म्हणाले.