Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ला- मातोंड गावच्या सीमा बंद...

वेंगुर्ला- मातोंड गावच्या सीमा बंद…

“कोरोना” विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय…

वेंगुर्ला.ता,२६: तालुक्यातील मातोंड ग्रामपंचायतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला असून मातोंड गावच्या पाचही सीमा बंद केल्या आहेत.त्यामुळे आता मातोंड मध्ये बाहेरील व्यक्तींना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने महत्वाची पावले उचलली असून संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. शासनाकडून नागरिकांना घरातून बाहेर न येण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही नागरिकांना अद्यापही याचे गांभीर्य नसल्याने काही बाहेरून आलेले व्यक्ती एका गावातून दुसऱ्या गावात फिरत आहेत. मातोंड गावातही अशा व्यक्ती खुलेआम फिरताना आढळल्याने ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच जानवी परब यांनी हा निर्णय घेतला आहे. यावेळी ग्रामपंचायात च्या वतीने गावातील काही युवकांना स्वयंसेवक ची ओळखपत्रे देण्यात आली असून ज्या ठिकाणी सीमा बंद केल्या आहेत.त्याठिकाणी २ स्वयंसेवक यांना ठेवण्यात आले आहेत. तसेच येथील रेशन दुकान वर ग्रामस्थांना उभे राहण्यासाठी १ मीटर अंतरावर मार्किंग करण्यात आले असून त्याच पद्धतीने ग्रामस्थांना धान्य देण्यात येत आहे. अशी महिती सरपंच परब यांनी दिली आहे. तसेच आवश्यकता नसल्यास गावातील नागरिकांनीही बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments