सामाजिक जबाबदारी म्हणून मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
वेंगुर्ले.ता,२६:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी आज आपल्या वेतोरे-पालकरवाडी येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मास चे वाटप केले तसेच त्यांच्या सोईसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. सामाजिक जबादारी म्हणून त्यांनी हे सामाजिक कार्य केले.
सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशात संचारबंदी चालू आहे. यामध्ये बेघर असलेल्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जि. प.अध्यक्ष समिधा नाईक यांनी आपल्या गावात रस्त्याच्या कामासाठी आलेल्या कामगारांना मदतीचा हात दिला. या ठिकाणी असलेल्या कामगारांच्या १५ कुटुंबातील सर्वांना तोंडाला लवायच्या मासचे वाटप केले. तसेच त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू यामध्ये तांदूळ, डाळ, भाज्या आदींचे वितरण केले. या मदतीमुळे कामगारांच्या कुटुंबियांनी नाईक यांचे आभार मानले. यावेळी नाईक यांचे पती माजी जि. प.सदस्य समीर नाईक तसेच वेदांत नाईक, संदीप चीचकर आदी उपस्थित होते.