Wednesday, May 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedगावच्या सीमा बंद करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार...

गावच्या सीमा बंद करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार…

दीक्षित कुमार गेडाम; सीमा बंद करणे बेकायदेशीर

ओरोस ता 27
गाव बंद करणे हे बेकायदेशीर आहे कोणालाही गाव बंद करता येणार नाही गाव बंद केले आहेत अशा घटना कानावर आलेल्या आहेत त्याची खात्री करून या सर्वांना सुरुवातीला सूचना दिल्या जातील याचं पालयन नकेल्यास गाव बंद करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी स्पस्ट केले.
कोरोना या विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. आपल्या राज्यातही या विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गावात येणाऱ्या लोकांना गाव बंद करण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. रस्त्यांवर झाडे तोडून ठेऊन हे गाव बंद केले जात आहेत. खरे म्हणजे कारण कोणतेही असो गाव बंद करणे हे बेकायदेशीर आहे. यामुळे संबंधित गावांमध्ये अत्यावश्यक वस्तूही पोचणे अवघड आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक कुणालाही थांबविता येणार नाही. त्याचप्रमाणे गावात मुंबई, पुणे आदी ठिकाणांवरून कोणी गावातील ग्रामस्थ आला असेल तर त्यालाही गावात येण्यापासून बंदी घालने असेही करता येणार नाही. जिल्ह्यात काही गावातील लोकांनी गाव बंद केले असल्याच्या घटना कानावर येत आहेत. मात्र या सर्वांना विनंती आहे की त्यांनी असे करू नये. मात्र एवढी विनंती करूनही या व्यक्ती ऐकल्या नाहीत तर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गोव्यात असलेल्यांना गोव्यातच राहावे लागेल
मूळ सिंधुदुर्गातील मात्र सध्या कामनिमित्त गोव्यात असलेल्यांना जिल्ह्यात आणावे अशी विनंती केली जात आहे. मात्र असे होणार नाही. लॉकडाऊन म्हणजे ज्याठिकाणी जे लोक आहेत. ते लोक त्याचठिकाणी राहतील. त्यामुळे कुणालाही जिल्ह्यात आता लॉकडाऊनचा कालावधी संपत नाही तोपर्यंत आणले जाणार नाही. जे आमचे लोक गोव्यात आहेत त्यांची सर्व व्यवस्ता पाहणे ही गोवा सरकारची जबाबदारी आहे आणि ही जाबाबदारी ते व्यवस्तित पार पडत आहेत. तसेच गोवा, केरळ, कर्नाटक आदिठिकाणचे जे लोक आपल्या जिल्ह्यात आहेत. त्यांची जाबबदारी आमची आहे असेही श्री गेडाम यांनी स्पस्ट केले.
रिकाम्या वाहनांतून माणसे नेल्यास कडक कारवाई
सध्या केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे याच वाहतुकीसाठी जिल्ह्यांच्या सीमा मोकळ्या केल्या जातात. ही वाहतूक सुरळीत राहणार आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू उतरल्यानंतर रिकाम्या होत असलेल्या वाहनांतून लोकांना इतर जिल्ह्यांमध्ये नेले जात असल्याचे प्रकार निदर्शनास येऊ लागले आहेत. हे प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यातील प्रत्येक तपासणी नाक्यावर जीवनावश्यक वस्तू उतरवून रिकामी जाणारी वाहने तपासली जाणार आहेत. या वाहनांमधून लोकांनां नेत असल्याचे निदर्शनास आल्यास असे वाहन चालक, वाहने आणि संबंधित लोक यांच्यावर कडक गुन्हे दाखल केले जातील त्यामुळे अशी वाहतूक कुणीही करू नये असेही श्री गेडाम यांनी स्पष्ट केले. तसेच जिवनावश्‍यक वस्तूंची दुकाने नियमित सुरू राहणार आहेत. ही दुकाने बंद केली जाणार नाहीत. मात्र लोकांनी गर्दी करू नये आपल्याला ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या सर्व मिळतील मात्र कोणत्याही प्रकारे गडबड, गोंधळ करू नये असे आवाहनही गेडाम यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments