सावंतवाडी तहसीलदारांची माहिती; सिंधुदुर्ग प्रशासनाकडून माहिती मागवली
सावंतवाडी.ता,२८: गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण व तरुणींना गोवा शासनाकडून आहेत त्याठिकाणी सुविधा देण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.त्यादृष्टीने जे कोणी अडकले आहेत,त्यांनी आपली नावे आपले गाव असलेल्या आपल्या मुळ गावच्या संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच,नगरसेवक किंवा तलाठी यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.
अद्यापपर्यंत अडकलेल्या लोकांना घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु केवळ माहिती ती घेण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाले आहेत. ती देऊन आम्हाला लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे. यात कुटुंबासह राहत असलेल्या व्यक्तींना वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्या मुले किंवा मुली अडकले आहेत.त्यांनी आपल्या गावातील सरपंच नगरसेवक किंवा तलाठी यांच्याकडे अधिकृतरित्या नावे द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.