राजन तेली; १५ दिवसाचे साहीत्य घरपोच करण्याची दिली हमी…
सावंतवाडी,ता.३०: गोव्यात अडकलेल्या मुलांसह मुलींनाही सिंधुदूर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेेत. मात्र,हा निर्णय होई पर्यत त्यांना पंधरा दिवसाच्या जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येणार आहे.त्यासाठी आवश्यक असलेली परवागनी दोन्ही ठिकाणच्या जिल्हाधिकार्यांकडे मागण्यात आली आहे, अशी माहीती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली.दरम्यान ब्रेकिंग मालवणीकडुन अडकलेल्या साडे चारशेहून अधिक मुलामुलींचे नंबर तेली यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे या उपक्रमांचे तेली यांनी कौतूक केले .
गोव्यात अडकलेल्या मुलांना या ठिकाणी आणण्यासाठी सिंधुदूर्ग भाजप गेेल तीन ते चार दिवस प्रयत्नशील आहे. यासाठी ब्रेकींग मालवणीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र या विषय दोन राज्यांच्या मधील असल्यामुळे त्याला परवानग्या मिळताना अडचणी येत आहेत. दरम्यान आज याबाबतची माहीती श्री.तेली यांनी दिली. ते म्हणाले, याठिकाणी संबधित मुलांना अधिकृतरीत्या आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तो पर्यत त्यांची हेळसांड होवू नये, यासाठी आम्ही त्यांना पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू देणार आहोत. विशेष म्हणजे ती मुले ज्या ठीकाणी आहेत, त्या ठीकाणी ही सेवा देण्यात येणार आहे. यासाठी गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सुध्दा पुढाकार घेतला आहे. दोन्ही राज्याच्या जिल्हाधिकार्यांनी परवानग्या दिल्यानंतर तात्काळ वाटप सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.