मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश; तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची माहिती
सावंतवाडी.ता,३१: जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी भुसारी दुकाने तात्काळ सुरू करा अशा सूचना मुख्य कार्यकारी सिंधुदुर्ग यांनी आज दिल्या आहेत.त्यामुळे आज पासून तीन दिवस बंद राहणार असलेली दुकाने तात्काळ दुपारपासून सुरू होणार आहे. मात्र नागरिकांनी गर्दी करू नये आवश्यक डिस्टन्स पडावे असे आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी ब्रेकिंग मालवणीशी संपर्क साधून ही माहिती दिली.
ते म्हणाले शहरात जंतुनाशक फवारणी करण्यासाठी आज सकाळपासून तीन दिवस दुकाने बंद करण्याचा निर्णय सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब व व्यापाऱ्यांनी घेतला होता,परंतु जीवनावश्यक वस्तू ची आवश्यक गरज लक्षात घेता तात्काळ दुकाने सुरू करण्यात यावेत अशा सूचनावजा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आज दुपारपासून पुन्हा दुकाने सुरू होणार आहेत.