राजन राणे; जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली मागणी…
सिंधुदुर्गनगरी ता.३१: आपत्कालीन मध्ये शासनाच्या कार्यात काम करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना सहभागी करुन घ्या,अशी मागणी संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष राजन राणे यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
आपत्कालीन संकट कोरोनां महामारी टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लाॅक डाउन संचारबंदी जाहीर केली आहे.कोणीही या काळात घराच्या बाहेर पडू नये,असे जाहीर आवाहन केले आहे.तिन महिन्यासाठी सर्व जनतेला अन्न धान्यापासून उपाशी राहू नये म्हणून शासनाने तिन महिन्याचे धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.हे कामं करण्यासाठी मनुष्य बळं आवश्यक आहे,हे मनुष्य बळ संस्था कडे आहे.या उपक्रमात संस्था शासनाला सहकार्य करण्यास तयार आहेत.ग्रामीण व शहरी भागात घर पोच पुरवठा करणे रेशन माल अन्य अत्यंअवशक सेवा कंत्राटी जे काम असेल ते काम राज्यातील नोंदणी कृत बेरोजगार सहकारी संस्थ आहे.या संस्थेचा उपयोग शाशनाने केला तर या माध्यमातून धान्य घर पोच देणे शक्य आहे.शासनाची योजना लाभार्थी पोचणार आहे. तरी या सामाजिक उपक्रमात संस्थाना समाविष्ट करून द्या असे आवाहन करण्यात आले आहे.संपर्क. चेअरमन राजन राणे मो.नं.9421128428, चेअमन शिरिष नाईक मो.नं.9421191051, चेअरमन मोहन परब मो.नं.9420821924,या नंबर वर संपर्क साधावा .