सावंतवाडी पंचायत समिती सभापतींच्या सरपंचांना सूचना
सावंतवाडी.ता,०१: जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना शहराकडे यावे लागत आहे,आता पोलिसांनी कारवाई करण्यात आलेले घेतल्यामुळे अनेकांना नाहक त्रास होत आहे.त्यामुळे सरपंचांनी आपल्या गावातच भाज्या दूध आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करावी अशा सूचना सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती मानसी धुरी यांनी दिले आहेत.याबाबत त्यांनी ब्रेकिंग मालवणीशी संपर्क साधून माहिती दिली.
त्या म्हणाल्या कोरोनाच्या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.त्यामुळे काळजी घेणे काळाची गरज आहे. मात्र ग्रामीण भागात लोकांना भाज्या तसेच अत्यावश्यक गोष्टी आणण्यासाठी शहराकडे यावे लागते मात्र आजपासून पोलीस व जिल्हा प्रशासनाने दुचाकी चालकावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.आपला भाग डोंगराळ व ग्रामीण असल्यामुळे तूर्तास तरी ही कारवाई योग्य नाही,परंतु तरीही येथील सरपंचांनी ग्रामीण भागातील लोकांची अवहेलना होणार नाही,त्यांना त्रास होणार नाही यासाठी गावातच भाज्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करावी अशा सूचना धुरी यांनी केल्या आहेत.