लॉकडाउनच्या काळात आंबोली-चौकुळ “नॉटरिचेबल”…

218
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थ नाराज; बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी तात्काळ लक्ष देण्याची केली मागणी…

सावंतवाडी,ता.२८:  ऐन लॉकडाउनच्या काळात आंबोली-चौकुळ मधील बीएसएनएलची सेवा नॉट रिचेबल झाली आहे.त्यामुळे त्या ठीकाणी ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.गेले आठवडाभर ही समस्या सुरू आहे.वेळोवेळी याकडे लक्ष वेधून सुध्दा निगमचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यामुळे लोकांना निर्माण होणारी समस्या लक्षात घेता तात्काळ याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी,असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.