वेंगुर्ले, ता.२१ : अलिकडे समुद्रात आलेल्या उधाणामुळे खाडी शेजारील असलेल्या बंधाऱ्यावरुन शेती बागायतीत घुसल्याने पाल गावातील शेती बागायतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाल गावातील बंधाऱ्याची उंची वाढविणे व मोऱ्या दुरुस्ती करणे अशी मागणी पाल ग्रामंपचायतीने प्रादेशिक बंदर अधिकारी, खारलॅण्ड विभाग व तहसिलदार यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी समुद्रात वायू वादळ निर्माण झाले होते. या वादळामुळे आलेल्या उधाणाचे पाणी पाल गावातील गोडावणेवाडी, वादळवाडी व खाजणवाडी खाडी शेजारी असलेल्या बंधाऱ्यावरुन शेती बागायतीत घुसले. त्यामुळे येथील शेती बागायतीचे नुकसान झाले आहे. तसेच पिण्याचे पाणीही मचूळ झाले आहे. तरी संबंधीत विभागाने याठिकाणी पहाणी करावी आणि पाल गावातील बंधाऱ्याची उंची वाढवून मोऱ्यांचीही दुरुस्ती करावी अशी मागणी पाल ग्रामंपचायतीने प्रादेशिक बंदर अधिकारी, खारलॅण्ड विभाग व तहसिलदार यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे.