शिंदेकडून प्रस्ताव आल्यास भाजप नक्कीच स्वीकारेल…

10
2
Google search engine
Google search engine

चंद्रकांत पाटील; शिवसेना नम्रपणे वागली असती, तर ही वेळ आली नसती…

मुंबई,ता.२१: एकनाथ शिंदे यांच्याकडुन प्रस्ताव आल्यास भाजप नक्कीच तो स्वीकारले, असा हिरवा कंदील भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. दरम्यान शिवसेना नम्रपणे वागली असती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, खासदार संजय राऊत यांच्या कायम चुकीच्या भूमिकेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेशी फारकत घेऊन नॉटरिचेबल झाले आहेत. भाजपच्या मदतीने ते सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.