सावंतवाडी मोती तलावाचा कोसळलेला कठडा तात्काळ दुरुस्त करा…  

7
2
Google search engine
Google search engine

संजू परबांनी केली पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी…

सावंतवाडी,ता.३०: नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता येथील मोती तलावाचा कोसळलेला कठडा तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान याकडे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तशा सूचना मुख्याधिकाऱ्यांना द्याव्यात, तर त्याठिकाणी कोणताही अनर्थ घडल्यास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्री. परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कोसळलेल्या कठाड्याची पाहणी केली. त्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, येथील मोती तलावाचा कठडा चुकीच्या पद्धतीने गाळकाढल्यामुळे दोन ठिकाणी कोसळला. हा प्रकार दोन वेळा घडला. मात्र संबंधित प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे निदर्शनास येत आहे. केवळ त्या ठिकाणी धोक्याचा इशारा दाखवण्यात आला. मात्र दुरुस्ती बाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तर भविष्यात मोठा पाऊस आल्यानंतर तो आणखीन कोसळून त्याचा फटका शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-गोवा महामार्गाला बसू शकतो. त्यामुळे अपघातासह त्या ठिकाणची वाहतूक सुद्धा बंद होऊ शकते. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याआधीच प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना त्या ठिकाणी राबवाव्यात व त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.