रेल्वेतून खाली पडल्यामुळे वेत्ये येथे बिहारी कामगाराचा मृत्यू…

3
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२०: रेल्वेतून तोल जावून खाली पडल्यामुळे बिहारी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळ वेत्ये येथे उघडकीस आली. नागेंद्र पासवान (वय ३८) असे त्याचे नाव आहे. तो आपल्या पत्नी सोबत वास्को-पटना या गाडीने प्रवास करीत होता. तो दरवाज्यावर बसला असावा आणि झोपेत त्याचा तोल गेला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याठिकाणी धाव घेत पंचनामा केला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मुळे बिहार येथील पासवान हा आपल्या पत्नी समवेत गोवा येथे बांधकामावर काम करीत होता. दिवाळी असल्याने तो आपल्या पत्नी समवेत गावी निघाला होता. मात्र वाटेतच हा प्रकार घडला. यात प्राथमिक तपासात संशयास्पद असे काहीच नाही. झोपेत तोल जावून तो पडला असावा, असा अंदाज पोलिसांकडुन व्यक्त होत आहे.