रस्त्यावर सांडपाणी सोडणाऱ्यांची आंबोली-बाजारवाडी ग्रामपंचायतीकडून पाठराखण…

2
2
Google search engine
Google search engine

आता प्रशासनावरच कारवाई करा; महेश नार्वेकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

सावंतवाडी ता. ०८: आंबोली-बाजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नं.१ समोरील रस्त्यावर सांडपाणी सोडणाऱ्यांकडे लक्षवेधून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप तेथील रहिवासी महेश नार्वेकर यांनी केला आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासन कोणतीच दखल घेत नसेल तर आता त्यांच्यावरच कारवाई करा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन श्री. नार्वेकर यांनी प्रसिद्धीस दिले.