भाजपची ताकद कायम राखण्यास विविध विकास कामे तळागाळात पोहोचवा…

7
2
Google search engine
Google search engine

नितेश राणे; सावंतवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न…

सावंतवाडी ता. १५: सिंधुदुर्गात आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भाजपाची ताकद कायम राखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आलेली विकास कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी आज येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले. दरम्यान जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात गावनिहाय कोट्यावधी रुपयांचा विकास निधी येत आहे. मात्र ज्या योजना अमलात आणल्या जात आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सद्यस्थितीत प्रभावी मानल्या जाणाऱ्या सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मिशन २०२४ आणि होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने आजची सावंतवाडीतील भाजपची जिल्हा कार्यकारणी बैठक वैश्य भवन येथे संपन्न झाली. या बैठकीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे , भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, युवराज लखम सावंत-भोसले, बाळू देसाई, संजू परब आदी उपस्थित होते.
भाजपची
जिल्हा कार्यकारणी बैठक आतापर्यंत एकाच ठिकाणी होत होती. मात्र प्रदेश स्तरावरून यापुढे जिल्हा कार्यकारणी बैठक प्रत्येक तालुक्यात घेण्याचे सुचित केले. त्यानुसार भाजपचे जिल्हा कार्यकारणी बैठक प्रथमच सावंतवाडीतून घेण्यास प्रारंभ करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार राणे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना लोकांपर्यंत येत आहेत. तसेच राज्य सरकार गावागावात विकास निधी देत आहेत. आणि भरघोस निधी आता मिळू लागला आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्या, असे त्यांनी स्पष्ट केले.