ओवळीये येथे चाळीस एकरात सहाशे ते सातशे झाडांची कत्तल…

9
2
Google search engine
Google search engine

वन अधिकारी सुशेगाद; वृक्षतोड तात्काळ थांबवा, रामानंद शिरोडकरांची मागणी…

सावंतवाडी,ता.०१: तालुक्यातील ओवळीये येथे तब्बल चाळीस एकरहून अधिक सामाईक जमीन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाली आहे. सहा ते सातशे झाडे तोडली आहेत. याकडे वन अधिका-यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे दिवसा ढवळ्या होणारी ही जंगलतोड तात्काळ थांबवा, अशी मागणी सामाईक भूमी संवर्धन व हितवर्धक समिती ओवळीयेचे गावचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी केली.
दरम्यान याबाबत सावंतवाडी उपवनसंरक्षकांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर देवसू वनपालांकडून पंचनामे करण्याचे दिखावू काम केले जात आहे. मात्र हा प्रकार तात्काळ रोखला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत श्री. शिरोडकर यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.