सावंतवाडी आंबोली राज्यमार्गाची तात्काळ डागडुजी करा…

11
2
Google search engine
Google search engine

संजय लाडांची मागणी; सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांचे वेधले लक्ष…

सावंतवाडी,ता.२८: आंबोली-सावंतवाडी या राज्यमार्गाचे मे महिन्यात डांबरीकरण करुन सुध्दा हा रस्ता वाहतूकीस धोकादायक झाला आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची डागडुजी होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा, अशी मागणी माडखोलचे माजी सरपंच संजय लाड यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे केली.

करोडो रुपये खर्च करुन ऐन मे महिन्याच्या सुरुवातीला हे काम करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात हे काम खराब झाले आहे. याकडे श्री. लाड यांनी आज बांधकामच्या अधिकारी विजय चव्हाण यांचे लक्ष वेधले असता आठवड्या भारत रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू करू असे ते म्हणाले.