नुसती भलावण नको, केसरकरांनी १४ वर्षात काय दिवे लावले याचे उत्तर द्या…

16
2
Google search engine
Google search engine

संजय विर्नोडकर; हत्तीबाबत दुटप्पी भूमिका, तिलारी राखीव करण्याचा कुटील डाव…

दोडामार्ग,ता.०१: मंत्री दीपक केसरकरांनी गेल्या तेरा-चौदा वर्षात मतदार संघात नेमके काय दिवे लावले हे प्रेमानंद देसाई यांनी जाहीर करावे, नुसती त्यांनी भलावण करू नये, केसरकरांनी प्रामाणिकपणे हत्तींचा प्रश्न सोडवला असता तर लोकांवर आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असा टोला भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख संजय विर्नोडकर यांनी लगावला आहे. एकीकडे केसरकर हत्ती हटवूया म्हणतात तर दुसरीकडे तिलारी जंगल राखीव संवर्धन क्षेत्र करुया, असे जाहीर करतात मग या मागे नेमका त्यांचा कोणता कुटील डाव आहे. मात्र आमच्या भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी प्रामाणिक प्रयत्न केले हे जनतेला माहित आहे त्यामुळे देसाई यांनी आरोप-प्रत्योराप करण्यापुर्वी अभ्यास करावा, असे ही त्यांनी म्हटले आहे.

भाजपाचे नेते तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केलेल्या टिकेला श्री. देसाई यांनी उत्तर दिले होते. त्याला विर्नोडकर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले आहे.