बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार…

39
2
Google search engine
Google search engine

न्हावेली येथील घटना; शेतकऱ्याचे ५ हजाराचे नुकसान…

बांदा,ता.३१: शेत मांगरात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे वासरू जागीच ठार झाले आहे. ही घटना न्हावेली-नागझरवाडी येथे घडली. यात शेतकरी सुनील लक्ष्मण परब यांचे ५ हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान भरवस्तीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.