आंबोली घाटात अपघात, धाराशिव येथील १ ठार…

68
2
Google search engine
Google search engine

अन्य ६ जण जखमी; गाडीच्या धडकेने झाड उन्मळून कोसळले…

सावंतवाडी,ता.०३: चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या बाजू असलेल्या झाडावर थार गाडी आदळल्याने आंबोली येथे झालेल्या अपघातात उस्मानाबाद-धाराशिव येथील १ जागीच ठार झाला आहे. दत्तात्रय व्यंकट जाधव (वय २८, रा.थेरमळा, ता.कळंब) असे त्याचे नाव आहे तर ६ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी साडे चार वाजता हाॅटेल आराध्या परिसरात घडली. गाडीचा वेग इतका होता की झाड उन्मळून पडले आहे.
महादेव भगवान बांगर (वय ३१, रा. धाराशिव), गणेश दिलीप साळुंखे (वय २२, रा. अहमदनगर-जामखेड), बालाजी भगवान बांगर (वय ४०, रा. येरमाळा-कळंब), सुनील कृष्णकुल भैय्या (वय ३१ रा.शिरोळे बीड) नवनाथ विठोबा जाधव (वय ३९, रा. केज-बीड) विष्णू बांगर (रा. धाराशिव-कळंब) अशी जखमींची नावे आहेत. हे सातही जण आपल्या थार कारने लातूरहून गोव्याच्या दिशेने चालले होते. यावेळी भरता वेगात गाडी असताना त्यांचा अपघात झाला. यात गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आढळल्याने ही घटना घडली. यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. याबाबतची माहिती मिळतात आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जखमींवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश दुधवाडकर,मनिष शिंदे यांच्यासह सुनिल नार्वेकर, मायकर डिसोजा, अजय नार्वेकर आणि ग्रामस्थांच्या मदतीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.