भ्रष्टाचार बाहेर काढल्याच्या पार्श्वभूमीवर भेटः घाटात संरक्षक भिंती बांधून घेण्याची मागणी..
सावंतवाडी ता.२४: आंबोली घाटातील कामात झालेला भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवून अधिकारी व ठेकदारावर कारवाईची मागणी करणार्या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आज आंबोली ग्रामस्थांनी आभार मानले.दरम्यान त्यांनी घेतलेली भूमिका योग्य असून यापुढे आता होणारे काम चांगल्या दर्जाचे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच घाटात अनेक ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याची गरज आहे. याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.श्री. साळगावकर यांच्या कार्यालयात भेट घेवून ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी आंबोली येथील ग्रामस्थ केशव जाधव, किसन पवार, प्रीतम सावंत, शशिकांत जाधव, प्रकाश जाधव त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे नेते अण्णा केसरकर, माजी नगरसेवक विलास जाधव व बंड्या तोरस्कर आदि उपस्थित होते.