देवगड,ता.१४: येथील मिठमुंबरी-बागवाडी बीचवरुन ११८ ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना जीवदान देण्यात आले. १३ एप्रिलला सायंकाळी रीडले कासवाच्या एका घरट्यातून १२३ अंड्यापैकी ८१ पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून ९५ पैकी ३७ पिल्ले सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आली.
यावेळी वनविभागाचे वनरक्षक निलेश साठे, वनमजूर कृष्णा सुद्रिक, मिठमुंबरी गावाचे सरपंच बाळकृष्ण गांवकर, कांदळवन समितीचे बीच मॅनेजर लक्ष्मण तारी, गाबीत समाज देवगड अध्यक्ष संजय पराडकर, प्रियांका तारी, नारायण तारी, मयुरेश तारी, ओमकार तारी प्रमोद आडकर, रोहन तारी, अभय पराडकर, नंदकिशोर पराडकर, हितेश खवळे, भुषण निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
कासव संवर्धनच्या माध्यमातून सावंतवाडी वनविभाग, मालवण कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान मुंबईच्या माध्यमातून आगामी काळात या मिठमुंबरी बीचवर कासव महोत्सव आयोजित करण्यात यावा जेणे करून बहुसंख्य ग्रामस्थ व पर्यटक यांना कासव संवर्धनाचे महत्त्व व येथील संपन्न जैवविविधतेची परिपुर्ण माहिती घेता येईल व कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटता येईल अशी मागणी ग्रामस्थांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.
मिठमुंबरी-बागवाडी बीचवर ११८ ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना जीवदान…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.