अवजड वाहतुकीस भुईबावडा घाट मार्ग अखेर सुरू…

187
2
Google search engine
Google search engine

नितेश राणेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; ६ चाकी वाहने चालविण्यास मुभा…

वैभववाडी,ता.१५: भुईबावडा घाट अखेर उद्यापासून वाहतूकीसाठी खुला होणार आहे. तशा प्रकारचा सकारात्मक निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केला असून ६ चाकी वाहनांसाठी तुर्तास हा घाट सुरू करण्यात येणार आहे. यासाठी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा केला. याबाबतची मागणी जिल्ह्यातील ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी राणे यांनी भेट घेवून केली. त्यानंतर राणे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी उद्या पासून हा मार्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी राणेंचे आभार मानले.
घाटमाथा व कोकण यांना जोडणारा प्रमुख दुवा म्हणून वैभववाडी तालुक्यातील करूळ व भुईबावडा घाटाकडे पाहिले जाते. जानेवारी पासून करूळ घाट मार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी भुईबावडा घाटातून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. सध्याचा हंगाम हा आंबा, काजू बागायत दारांसाठी महत्वाचा आहे. अशा परिस्थितीमध्ये हा घाटमार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्यामुळे बागायतदारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सहा चाकी गाड्यांना तरी मुभा देण्यात यावी, अशी मागणी कणकवली येथील स्वराज्य ट्रक मालक संघटना सिंधुदुर्ग व वाळू वाहतूक संघटना कोल्हापूर यांच्या माध्यमातून राणेंकडे करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, सागर पाताडे, अवधूत शेटये, समीर पाताडे, आशितोष परब, स्वराज पाताडे, गोट्या पांचाळ, मयुरेश गुरव, सिद्धेश रावराणे, चिन्मय तळेकर, कोल्हापूर येथील संघटनेचे अतुल जाधव, राकेश शिंदे, बापू वरदे, गणेश शिंदे, श्री.निगडे, राजु बर्गे आदी उपस्थित होते.