शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी खत विक्रीचा दर निश्चित करा…

113
2
Google search engine
Google search engine

स्वागत नाटेकर; तालुका व पंचायत समिती कृषी विभागाकडे मागणी…

बांदा,ता.१६: केंद्र सरकारने रासायनिक खतांचे दर अनुदान निश्चित केले आहेत. तसेच मूळ किंमत पिशवीवर लिहिलेले असून सुद्धा खत विक्री करणारे व्यावसायिक आपल्याला पाहिजे ते दर लावून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारे फसवणूक टाळण्यासाठी खत विक्रीचा दर निश्चित करावा, अशी मागणी इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी प्रसिद्ध दिले आहे.

त्यात असे नमूद केले आहे की, सावंतवाडी तालुका खत विक्रेता दुकानदार यांच्याकडून खतांच्या किमती मध्ये असलेली तफावत मागील वर्षी समोर आणली होती. केंद्र सरकारने रासायनिक खतांचे दर अनुदान निश्चित केलेलं आहेत. सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान, आणि त्या खताची मूळ किंमत यांच्या बाबत खताच्या पिशवीवर ठळक अक्षरात लिहिलेले असून सुद्धा खत विक्री करणारे व्यावसायिक आपल्याला पाहिजे ते दर लावून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. ही बाब गतवर्षी उजेडात आणली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अगोदरच खत वाढीव दराने विकल्याने आमच्या सारख्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. याबाबत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी यावर्षीचा खत विक्रीचा दर आपण शेतकऱ्यांना व खत विक्रेता व्यावसायिक यांना आधीच निर्धारित करावी, व कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी श्री. नाटेकर यांनी केली आहे.